नवी दिल्ली – केरळमध्ये सुरुवातीच्या विलंबानंतर, नैऋत्य मान्सून रविवारपासून दक्षिण द्वीपकल्प आणि देशाच्या पूर्व भागात पुढे सरकणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, “बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनच्या पुढील प्रगतीवर आणि हंगामी पर्जन्यमानाच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होणार नाही.
चक्रीवादळ बिपरजॉय ओमानच्या दिशेने वायव्येकडे सरकले असते, तर त्याचा मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम झाला असता,” महापात्रा म्हणाले की, या चक्रीवादळाने विषुववृत्तीय प्रवाह बळकट करून मान्सूनच्या प्रगतीला मदत केली आहे कारण ते दक्षिण-पश्चिमेकडे सरकले आहे. ते अरबी समुद्राच्या पूर्वेकडे तयार झाले आहे. 1
8 ते 21 जून दरम्यान दक्षिणी द्वीपकल्प आणि पूर्व भारत आणि लगतच्या भागात नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाच्या उपस्थितीमुळे मान्सूनच्या प्रगतीला सुरुवातीला विलंब झाला होता. नैऋत्य मान्सून भारतात जून रोजी दाखल झाला, जो साधारणपणे जून रोजी केरळमध्ये पोहोचतो.