मुंबई – महाराष्ट्रासह दशातील आठ राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत एक लाख कोटी डॉलरच्या पुढे म्हणजे एक ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेलेली असेल असे एका अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. जर तसे झाले तर भारत 2047 पर्यंत विकसित देश झालेला असेल असे इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. (Maharashtra’s economy will be one lakh crore dollars)
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य आहे. आता महाराष्ट्र देशातील सर्वाधिक समृद्ध राज्यही ठरत आहे. शेअर बाजार आणि म्युचुअल फंडात देशात सर्वाधिक गुंतवणूक राज्यातून झाली. जीएसटी संकलनात राज्य कायमच अव्वल आहे. परदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रात आकर्षित होत असून थेट परकीय गुंतवणुकीतील 28.2% वाट्यासह देशात प्रथम आहे.
विकासाच्या घोडदोडीत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही राज्य आघाडीवर राहणारा असून या राज्यांची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2039 पर्यंत एक लाख कोटी डॉलरची झालेली असेल. महाराष्ट्राचे अर्थव्यवस्था सर्वात अगोदर एक लाख कोटी डॉलरची होईल. त्यानंतर कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागणार आहे. तर उत्तर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2042 मध्ये एक लाख कोटी डॉलरची होऊ शकेल असे समजले जाते.
मात्र महाराष्ट्र राज्याने 2028 पर्यंत एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशाने हे उद्दिष्ट अनुक्रमे 2030 आणि 2032 मध्ये साध्य करण्याचे ठरविले आहे. तर भारत सरकारने 2028 पर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे ठरविले आहे.
सध्याचा विकासदर पाहिल्यानंतर फक्त तीन राज्यांचे उत्पन्न 2028 पर्यंत अर्धा लाख कोटी डॉलरचे होऊ शकेल. सध्या भारतातील बहुतांश राज्यातील दरडोई उत्पन्न 1,080 ते 4,255 डॉलर असून ही राज्य अल्प मध्यम उत्पन्न गटात मोडतात. फक्त गोवा आणि सिक्कीम उच्च मध्यम गटात मोडतात. उत्तर प्रदेश आणि बिहार मधील दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे.