भोपाळ – मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी आज शपथ घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा काळ संपल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज सकाळी शिवराज वृक्षारोपणासाठी उद्यानात पाहोचले तेंव्हा पत्रकारांनी त्यांना गराडा घातल्यावर मोहन सिंह यादव यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही मध्य प्रदेशात स्वागत आहे…आणि मित्रांनो आता विदा असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वाक्यातून त्यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले आहेत का असा अर्थ काढला जातो आहे.