नवी दिल्ली – कोटद्वार-दिल्ली जंक्शन-कोटद्वार सिद्धबाली जन शताब्दी विशेष रेल्वेगाडीला आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक आणि इतर मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.
औषध, कोळसा व इतर आवश्यक वस्तू पुरवून करोनाच्या साथीदरम्यान देशाची सेवा करणाऱ्या कष्टकरी रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती गोयल यांनी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. कोटद्वार-दिल्ली मार्गाचे विद्युतीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे, केवळ 15 कि.मी.पर्यंतचे काम बाकी आहे, ते या महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवरील गाड्या कोटद्वार ते दिल्लीपर्यंत धावतील. यानंतर संपूर्ण उत्तराखंडमध्ये सर्व गाड्या इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावतील. यामुळे राज्यात शून्य कार्बन उत्सर्जन होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, असे त्यांनी सांगितले.