वालचंदनगर, (वार्ताहर) – नवीन शैक्षणिक धोरणानुसार वाणिज्य विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक संशोधन पद्धती संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे, असे मत वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. योगेश खरात यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन पद्धती’ या विषयावर इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग भैय्या यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कळंब, ता.इंदापूर येथील रणसिंग महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते प्रथम सत्र डॉ. विवेक बळे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, द्वितीय सत्र डॉ. सुभाष वाव्हाळ वाघिरे महाविद्यालय सासवड, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळिग उपस्थित होते. प्रथम सत्राचे मार्गदर्शक डॉ.विवेक बळे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संशोधनाची संकल्पना, घटक तसेच पदव्युत्तर वर्गातील विदयार्थ्यांना आपला संशोधन प्रकल्प अहवाल कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात डॉ. सुभाष वाव्हळ यांनी सद्यस्थितीत संशोधकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन प्रक्रियेतील आधारभूत बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. आधारित करपात्र उत्पन्न तसेच त्यासंदर्भात असलेले विद्यार्थ्यांचे तसेच प्राध्यापकांचे प्रश्न याविषयी वास्तव ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले. संशोधनामध्ये असंख्य करिअर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी ज्ञान असल्यास विविध क्षेत्रात व्यक्ती उच्च पदावर जाऊ शकते. प्रा. सोनाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रशांत शिंदे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी वाणिज्य विभागातील प्रा. गणेश ठोंबरे, प्रा. माधुरी खुळे यांचे सहकार्य लाभले.