मुंबई – राज्यातील महय्तवाची पाच अंमली पदार्थ प्रकरणे एनसीबीकडे सोपवावीत अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांनी पाठवले आहे, त्यामुळे या प्रकरणांचा तपास वर्ग करावा, असे पत्र एनसीबीने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
ही प्रकरणे कोणती याबाबतची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्याच्या अधिकारावर हा केंद्राकडून होणारा हल्ला असल्याची टीका राक्यातील सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिल्यानंतर एनसीबीच्या प्रमुखांकडून हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा केंद्र – राज्य संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून सातत्याने एनसीबीवर टीका करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अमित शाहांच्या या आदेशावरही टीका केली आहे. या प्रकरणावर बोलताना नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत.
या पत्रामध्ये एनआयबीने उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ज्या 5 महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात.
एनसीबीच्या महासंचालकांच्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह यांना सवाल विचारताना मलिक म्हणाले, त्यांनी एनसीबीला दिलेल्या आदेशात ज्या पाच केसेस नमूद केल्या आहेत. त्या केसेसचे निकष काय आहेत? एनसीबीने कारवाई केलेल्या छोट्या केसेस की राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या 3 टन ड्रग्जसारख्या मोठ्या केसेस आहेत, हे असे बोलत मलिकांनी एनसीबीसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. एनसीबीपेक्षा अधिक काम राज्याच्या अँन्टी नार्कोटिक्स विभागाने केले आहे. संबंधित पाच केसेसच्या माध्यमातून एनसीबी पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.