नगर, (प्रतिनिधी) – नगर एमआयडीसी मधील जुनी सह्याद्री कंपनी, सह्याद्री चौक भूखंड क्रमांक ए-१ चे बेकायदेशीररित्या औद्योगिक भूखंडातून वाणिज्य भूखंडामध्ये हस्तांतरण करूत अर्थांजनाच्या उद्देशाने छोटी-छोटी प्लॉटिंग करून उच्च रेटमध्ये विक्री केले जात आहेत. याला स्थगिती मिळावी यासाठी आदर्श जनरल कामगार संघटनचे अध्यक्ष प्रवीण सप्रे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात भूखंडाबाबत जनहित याचिका दाखल केली आहे.
जोपर्यंत निकाल लागत नाही. तोपर्यंत सदर कार्याची पूर्णतः स्थगिती मिळावी, असे निवेदन नाशिक येथील प्रादेशिक अधिकारी औद्योगिक विकास महामंडळ यांना देण्यात आले.यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे, श्री साई सामाजिक प्रतिष्ठान नवनागापूरचे अध्यक्ष आकाश कोल्हाळ उपस्थित होते.
औद्योगिक महामंडळाने शेतकर्याकडून शेती विकत घेताना या जागेवरती फक्त औद्योगिक कंपनी स्थापन केली जाईल; या उद्देशाने घेतले होते. पण त्यांचा उद्देश बाजूला ठेवून हे विशिष्ट समाजाच्या लोकांनी एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकार्यांशी हात मिळवणी करून अर्थानजनासाठी तेथे प्लॉटिंगचे कार्य सुरू केलेले आहे.
औद्योगिक विकासाच्या नावाने येथील शेत जमीन शेतकर्यांकडून अत्यंत अल्प दरात विकत घेतली गेली होती. त्याचा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना कसलाही फायदा झालेला नाही. यामुळे अनेक दिवस बंद असलेले सह्याद्री कंपनीची जागा परत आज स्थितीतील चालू मूल्यांकनाच्या आधारावर त्याच शेतकर्यांना परत मिळावी किंवा येथे राज्यातून मोठे औद्योगिक व्यवसाय परत सुरू करण्यात यावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.