हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा द्यावा तसेच अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई द्यावी व कर्जमाफी द्यावी या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा.आरोप करीत शेतकऱ्यांनी गोरेगावच्या अप्पर तहसील.कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजता 40 लिटर दुध रस्त्यावर सांडून सरकारचा निषेध केला.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी पिककर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने अवयव विक्रीसाठी काढले होते. या शेतकऱ्यांनी थेट मुंबईत जाऊन अवयव विक्रीचे दुकान मांडले. मात्र त्याठिकाणी आझाद मैदान पोलिस चौकीच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर कडाडून टिका केली. कर्जमाफी तसेच पिकविम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे आदेश त्यांनी शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई येथून परतलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाची वाट पाहिली. मात्र शासनाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन आणखी.तिव्र करण्याचा निर्णय घेतला.विधान सभेत देखील हा मुद्दा विरोधकांनी लाऊन धरला होता गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात.घोषणाबाजी करून 40 लिटर दुध रस्त्यावर सांडून सरकारचा निषेध केला.
यावेळी नामदेव पतंगे, गजानन कावरखे, रामभाऊ कावरखे, रामेश्वर कावरखे, मदन कावरखे, संतोष वैद्य, सखाराम भाकरे, बबन खिल्लारी, विश्वनाथ खोडके, मनोहर घुपसे, प्रमोद कावरखे, शिवाजी कावरखे, नारायण रवणे, बाळू जाधव, शोभाबाई लांभाडे,राधाबाई लांभाडे आदी शेतकरी उपस्थित होते.