श्री रविदासजी महाराज शिरसाठ, आळंदी
चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असताना तो जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा अमावस्या होते आणि तो सूर्याच्या विरुद्ध दिशेस असल्यास पौर्णिमा होते. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र दररोज एक एका कलेने वाढत जाऊन पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूर्णत्व येते.
परंतु शुक्ल पक्षातील या वाढत जाणाऱ्या कलांच्या पांघरुणामुळे तो हरपला किंवा झाकला न जाता उलट अधिक तेजस्वी दिसतो. कारण या कला त्याच्यापासून भिन्न नसून त्या अंगभूत म्हणजे चंद्ररूपच आहेत. किंवा जसे अग्नी पेटवून दिवा लावल्यानंतर,
तो अग्नी जरी दीपत्वाला प्राप्त झाला, तरी तो आन म्हणजे वेगळा ठरत नाही. अर्थात, मूळ अग्नीच्या ठिकाणी असणारी प्रकाशमानता ही दीपस्थित अग्नीच्या ठिकाणीही प्रत्ययाला येते. याचा अर्थ जगत निर्माण होण्याने ते परब्रह्म झाकले जात नाही आणि जगही त्या परब्रह्मापासून वेगळे सिद्ध होत नाही. ही सर्व उदाहरणे अद्वैताची आहेत..
– चांगदेवपासष्टी तत्त्वचिंतन (भाग – 8)