रामपूर – दुबई येथे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत आणि पारंपरिक पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारतातील काही लोकांनी पाकिस्तान संघाचं कौतुक केल तसेच भारतीय खेळाडूंची चेष्टा केली. अशा पद्धतीचं एक प्रकरण समोर आलं असून यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पाकिस्तान संघाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांविरुद्ध उत्तर प्रदेश सरकार आक्रमक झालं आहे. अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. रायपूर जिल्ह्यात एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली. पत्नीने भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानला समोर्ट केल्याचं पतीचं म्हणण आहे.
रायपूर जिल्ह्यातील इशान मियां दिल्लीत काम करतो. तर त्याची पत्नी राबिया शमसी रायपूर येथे राहते. भारत-पाकिस्तान सामन्यात इशान आपल्या मित्रासोबत भारतीय संघाला सपोर्ट करत होता. मात्र भारताचा पराभव झाल्याने इशान नाराज झाला.
दरम्यान इशानच्या पत्नीने भारताच्या पराभवानंतर पाकिस्तान जिंदाबादचं स्टीकर स्टेटसला ठेवलं. तसेच भारतीय खेळाडूंविषयी आपत्तीजनक शब्द वापरले. यामुळे इशानची प्रतिमा त्याच्या मित्रांमध्ये खराब झाली. त्यानंतर इशानने आपल्या पत्नीविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
वास्तविक पाहता पत्नीने याआधी आपल्या पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात हुंडा मागितल्याची तक्रार दाखल केलेली आहे.