मुंबई -लोकेश राहुलला झालेल्या दुखापतीमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात ईशान किशनला स्थान देण्यात आले आहे. तसेच तीन राखिव खेळाडूंमध्ये आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला स्थान मिळाले आहे. तसेच राखिव तीन खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडलाही स्थान देण्यात आले आहे. तिसरा राखिव म्हणून मुकेश कुमारचा समावेश करण्यात आला आहे.
मूळ संघ घोषित केला तेव्हा त्याचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराहपाठोपाठ आता राहुललाही दुखापत झाल्याने या रिक्त झालेल्या तीन जांगासाठी तीन खेळाडूंचा संघात नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यात इशानचा प्राधान्याने समावेश करण्यात आला. अय्यरच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळाली. तसेच तीन राखीव खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या ऋतूराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. त्यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळेच त्यांना स्थान देण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
फलंदाजी बळकट करण्याचा उद्देश
इंग्लंडचे वातावरण, तसेच ऑस्ट्रेलियाच्या वोगवान गोलंदाजीची ताकद पाहूनच संघात काही बदल होत आहेत. भारताची फलंदाजी जास्त बळकट व्हावी हाच यामागे उद्देश आहे, हे सहज दिसून येत आहे. त्यासाठीच रहाणेच्या पाठोपाठ ईशानलाही स्थान देण्यात आले आहे. तसेच सूर्यकुमारचाही समावेश करण्यावर भर दिला जात आहे, असेही दिसत आहे.