राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा आज 64वा वाढदिवस… गेली तीन दशके ते अविरतपणे विधीमंडळांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याचीच नव्हे; तर महाराष्ट्राची सेवा करताहेत. जनतेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत असताना तालुक्याची नेमकी नस त्यांनी ओळखली. आज आपण पाहतो सहकार क्षेत्रातील अद्वितीय व्यवस्थापन कौशल्याने आंबेगाव तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या तीन दशकांच्या राजकीय प्रवासात राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो विश्वास दाखवला तो केवळ सार्थच ठरवला नाही, तर पक्षाच्या माध्यमातून जी मंत्रीपदे वाट्याला आली, ज्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या त्यास वेगळी उंची गाठून देण्यात वळसे पाटील साहेब यशस्वी ठरले. प्रसंग आनंदाचा असो की दुःखाचा सतत लोकांमध्ये राहत या जनसामान्यांचा नेत्याने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले.
एकीकडे दुर्गम प्रदेश तर दुसरीकडे दुष्काळ असा आंबेगाव तालुका. पाऊस प्रचंड; परंतु पाण्याचा उपयोग नाही. उन्हाळ्यात सर्वच तालुक्यांत खूपच दुर्भिक्ष्य, लोकसंख्या मोठी, दरडोई क्षेत्र कमी. त्यामुळे परिस्थिती हलाखीचीच जवळपास प्रत्येक कुटुंबातील कोणीतरी रोजंदारीवर किंवा पुण्या-मुंबईला पाठवावे लागायचे तेव्हा कुठे गुजराण व्हायची. अशाच काहीशा परिस्थितीत साहेबांकडे आंबेगाव व तालुक्याचे नेतृत्व आले. इथे पाणी अडवता येईल ते शेतापर्यंत पाहोचवता देखील येईल; परंतु तालुक्यातील जनता त्याचा फायदा घेईल, ही शक्यता कमीच म्हणूनच सहकाराची मुहूर्तमेढ करणे गरजेचे होते. विठ्ठलराव विखे पाटील यांनी यापूर्वीच सहकार समृद्धी आणू शकतो हे सिद्ध केले होते. वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार साहेब यांची सहकार चळवळ खूप जवळून नामदार साहेबांनी पाहिली होती. स्व. आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती चालविली होतीच; परंतु खरेदी विक्री संघाची स्थापना करून एक दिशा दाखविली होती. त्यामुळे नामदार साहेबांसाठी या गोष्टी फारशा अवघड नव्हत्या.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कोट्यवधींची उलाढाल होतेय. शेतकऱ्यांचा सर्व माल संपवला जातोय, रोख पेमेंट आडत नाही. वाहतुकीची सक्षम सेवा, स्वत:ची इमारत व दर्जेदार सुविधा मिळताहेत. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आंबेगाव, शिरूर, समृद्ध करणारा उद्योग अफलातून व्यवस्थापन, काटेकोर नियोजन, राष्ट्रीय, राज्य स्तरावर अनेक पुरस्काराने वेळेवर पेमेंट करणारा कारखाना अशी ओळख सामाजिक बांधिलकी जपताना ओढे खोलीकरण, दुष्काळग्रस्तांना पाणीपुरवठा सामुदायिक विवाह सोहळे, युवक महोत्सव आयोजन, शैक्षणिक संस्थांना मदत अनेक गावोगावी विकास कामे, भीमाशंकर शिक्षण संस्थेमार्फत ज्ञानदान हे सर्व अविरतपणे सुरू आहे.
शरद सहकारी बॅंक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करणारी संस्था पारदर्शक कारभाराने उद्यमशील लोकांना, युवकांना नेहमीच हात देत आहे. 22830 सभासद – 898 कोटींच्या ठेवी, 641 कोटींचे कर्जवाटप, ऑडिट वर्ग अ दर्जा. या संस्थेच्या दिव्यत्वाची प्रचिती देतो अनेक उद्योजक घडविणारी संस्था म्हणजेच शरद सहकारी बॅंक लि. खरेदी विक्री संघ फक्त नावालाच असणारी संस्था साहेबांच्या परीसस्पर्शाने सुवर्णमय झाली. शेतकऱ्यांसाठी खते-औषधे रास्त दरात देतेय. हिरडा खरेदी, स्वस्त धान्य दुकाने, वरई खरेदीच्या माध्यमातून आदिवासी व शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या हक्कांचा पैसा देणारी संस्था दर्जेदार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करत नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारात पोहोचते आहे.
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र. ज्ञानदानाचे काम करणारी संस्था ही छोट्या व दुर्गम भागामध्ये शाळा उघडून आज वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. नालंदा इंग्लिश मेडियम स्कूल – इंग्रजी शिक्षणातून विद्यार्थी धावत आहे. वेरूळ, नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा ही संस्था चालवत आहे. आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था, आंबेगाव तालुका देखरेख संघ विविध गावातील सहकारी सोसायट्या… पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना बिनव्याजी अर्थपुरवठा करत आहे.
अनुसया पतसंस्था, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविले जात आहेत. अनेक छोट्या उद्योगातून या महिला आज बाजारपेठेत आपले अस्तित्च बनवून आहेत. डी. जी. फाऊंडेशन कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम, कार्यक्रम हातात घेऊन काय करत आहे. रयत शिक्षण संस्था व इतर खासगी शिक्षण संस्थांना नेहमीच मदत करत त्यांना नामदारसाहेबांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची स्थापना करत साहेबांनी महाराष्ट्र संगणक साक्षर करण्यामध्ये योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रामध्ये साहेबांचे योगदान, अनुभव, व्यवस्थापनामध्ये प्रभुत्त्व पाहिल्यानंतर पद्मविभूषण शरद पवारसाहेबांनी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदावर संधी दिली. ऊसशेती समोरील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या मदतीला देण्याचे त्यांचे प्रयत्न लवकरच क्रांती घडवतील.
ऑल इंडिया कॉ. ऑप शुगर फेडरेशनच्या अध्यक्षपदावर निवड ही त्यांच्या बुद्धीमत्तेची, अनुभवाची, कार्यकुशलतेची साक्ष देते आहे. साखर उद्योगासमोरील प्रश्न, भविष्यातील अडचणींचा अभ्यास करून सर्वांना बरोबर घेऊन ते केंद्र सरकारबरोबर सातत्याने पाठपुरावा करताहेत. सर्व सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आमचे सार्थ अभिमान असलेले साहेब तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपत आहेत. साहेबांनी हातात घेतल्यानंतर आजपर्यंत कोणत्याही संस्थेवर सातत्याने साहेबांचेच वर्चस्व राहिले आहे. आंबेगाव तालुक्यातील जनतेने नेहमीच साहेबांना साथ दिली आहे.
त्यामुळेच आंबेगाव तालुक्यातील हिरा आज देशातील सर्वोच्च संस्थेवर विराजमान आहे. साहेब एक विद्यापीठ आहे व त्यामधून सातत्याने आम्हाला ज्ञान मिळावे. साहेबांच्या ज्ञानाचा वारसा वृद्धीगत व्हावा… या ज्ञानाने काहींच्या पुढे जाण्याची शक्ती जनतेला मिळावी. साहेबांना उत्तम आरोग्य, स्नेहभरीत आनंद मिळावे व साहेबांच्या ज्ञानातून या देशाची भरभराट व्हावी, हिच मनोकामना!