Hasan Mushrif : आज १ नोव्हेंबर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मतदार याद्यातील घोळ यासंह काही प्रमुख मागण्या घेऊन सत्याचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चात विविध पक्षातील अनेक नेते सहभागी होणा असून त्यांचे भाषणे देखील होणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने मोठं विधान केले आहे. “आपल्या देशाची लोकसंख्या आज 140 कोटीच्या वर आहे. त्यातले 20 टक्के लोक सोडले तर बाकीचे मतदार आहेत. त्यामुळे काही चुका होतात. मात्र संधी असताना देखील आपण हरकती घेत नाहीत. त्यामुळे अशा चुका प्रशासन दूर करेल. आजचा मोर्चा जर त्यासाठीच असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांचा सदोष मतदारयाद्यांवर निवडणुका घेण्यास आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही, ” असे मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. त्यांनी असे विधान करून मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरात सुळ मिसळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा मोठा डाव! सतेज पाटील यांना जोरदार धक्का; काँग्रसेचा बडा नेता हाती ‘कमळ’ घेणार निवडणूक आयोगाच्या विरोधात मनसे आणि आघाडीतील पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून आज 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला जाणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार मुंबईत या मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल होत आहेत. मतदार यादीतील गोंधळ दुबार नावे मतचोरी आणि निवडणुकांतील कथित गैरव्यवहार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला सवाल या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी मोर्चा काढण्यावर मनसैनिक आणि महाविकास आघाडी ठाम आहे. आजचा मोर्चा हा इंडिया आघाडीचा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झालं हे आपण पाहिले आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. पण ज्या वेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते त्यावेळी ही बाब निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. मनसेविषयी म्हणाले… आता निवडणूक घेतली तर विरोधकांना पराभव दिसतो आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे, असा खोचक टोला त्यांनी या मोर्चावर लगावला आहे. मनसेमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कधीच जुळणार नाही, असे देखील विधान हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हेही वाचा : Roi Roi Binale: जुबिन गर्ग यांच्या अखेरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला विक्रमी गाजावाजा, ‘रोई रोई बिनाले’च्या पहिल्या दिवसाची कमाई चकित करणारी