कराड -महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोल्हापूर विभागाच्यावतीने सोमवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये टी.ई.टी.परीक्षा व शिक्षक भरती पोर्टल रद्द करणे, वेतनेतर अनुदान शाळांना देणे, बंद केलेली शाळा-कॉलेजेस परत चालू करणे. यावर सविस्तर चर्चा होऊन संस्थाचालक, शिक्षण तज्ञांनी मुद्दे मांडले.
बैठकीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक, शिक्षण तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुण्याचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविकामध्ये वरील तिन्ही विषयांबाबत माहिती दिली.
कोल्हापूर विभागाचे शिवाजी माळकर यांनी परीक्षा शिक्षक कर्मचारी भरती पवित्र प्रणाली अशास्त्रीय असून पालक विद्यार्थी यांच्यावर अन्याय करणारी आहे असे सांगितले. आटपाडीचे रावसाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या टीईटी परीक्षा घेण्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
असे सांगून शिक्षक कर्मचारी भरती पोर्टल प्रणालीचा या माध्यमातून निवड प्रक्रियेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी गेली चार वर्षे भ्रष्टाचार सुरू आहे. दूरवरचे शिक्षक कर्मचारी पवित्र प्रणालीतून नेमले तर शिक्षक कर्मचारी मनापासून काम करीत नाही यासाठी टीईटी परीक्षा व पवित्र प्रणाली त्वरित रद्द करावी.