मुंबई – गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढू लागला आहे. यामुळे अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. आगामी काळात हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. २० ते २१ ऑक्टोबर दरम्यान हे वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येणार वादळ हे ‘सीतरंग’ या नावाने ओळखले जाईल.
नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मुसळधार पावसामुळे हाल सोसावे लागत आहेत. अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा हताश झाला असून त्याला आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. म्हणुणच आगामी काही दिवसांसाठी देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि २३,२४ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
चक्रीवादळाचे नाव कसे ठरते
पूर्वी चक्रीवादळे तारखेनुसारच लक्षात ठेवली जायची परंतु एकावेळेस जास्त ठिकाणी जर वादळ निर्माण झाले तर ते लक्षात ठेवणे काठी व्हायचे. त्यानंतर जागतिक स्तरावर चक्रीवादळांना नाव देण्याचे ठरवण्यात आले.चक्रीवादळाच्या नावांची दक्षिण आशियायी देशांकडून काही नावे मागवण्यात आली त्या नावांची एक यादी करण्यात आली. सध्या तयार असलेली यादी इतकी मोठी आहे की जवळपास ३ वर्षे ही यादी पुरु शकते.