लोणी धामणी-मार्च महिना संपायला अवघे चार दिवस राहिलेत या चार दिवसांत एक सुट्टी, त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅकांच्या बाहेर गर्दी केली आहे. पण ही गर्दी एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. असा पुसटसा विचारही हे शेतकरी करत नाहीत.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे शासनाने जमाव बंदीचा आदेश काढला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. त्यासाठी आंबेगाव तालुक्यात सर्वच ग्रामपंचायती प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत आहेत. तर अनेक ग्रामपंचायतीने किराणा दूकाने, भाजीपाला, दूध, मेडिकल स्टोअर्स व इतर ठिकाणी नागरिकांनी अंतर ठेवण्यासाठी विशिष्ट चौकात उभे राहून खरेदी करावी. असा नियम करण्यात आला. त्या नियमांचे नागरिक तंतोतंत पालन करताना दिसतात. पण बॅंकेत पीक कर्ज भरताना मात्र बॅंकांनी या नियमांना “वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या आहेत.