नवी दिल्ली – दिल्लीत शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्याचे पुढील धोरण आणि दिशा ठरवण्यासाठी दिल्लीत 26 आणि 27 ऑगस्ट हे दोन दिवस शेतकऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याला देशातील शेतकरी संघटनांचे सुमारे पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सिंघु बॉर्डरवर हे अधिवेशन होणार आहे. तेथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नऊ महिने पुर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वच शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
गेले नऊ महिने सुरू असलेल्या या देशातील सर्वात मोठ्या शेतकरी आंदोलनात देशाच्या चारही दिशांमधील राज्यांतले शेतकरी सहाभागी व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे असेही आयोजकांकडून नमूद करण्यात आले आहे.