मुंबई – आरडीएक्स’ने भरलेला एक टट्रक गोव्याकडे गेल्याचा फोन आल्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून या ट्रकचा शोध सुरू करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पाकिस्तानचे दोन नागरिकही असल्याचेही फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वाढली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा फोन आला. हा ट्रक मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याकडे निघालेला असून त्यात पाकिस्तानचे दोघेजण देखील आहेत, असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. फोनवरील व्यक्तीने आपले नाव “पांडे’ असे सांगितले. हा फोन आल्यानंतर लगेचच महाराष्ट्र “एटीएस’ने गोवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळवले असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
हा फोन कोठून आला होता, याचा शोध पोलिसांकडून घेतला गेला आणि आता ते फोन करणाऱ्याचा सोध घेत आहेत. याबाबतची अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या ट्रकचा आणि फोन करणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेच्या पाकिस्तानला परतली नाही तर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या सीमा हैदरला मिळाली होती. त्यानंतर या “आरडीएक्स’ने भरलेल्या ट्रकबाबतचा फोन आल्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.