अकोले, (प्रतिनिधी) – देशाचे भविष्य आता धर्मगुरुंच्या हाती असून, धर्मगुरुंनी आपल्या प्रवचनातून खरा धर्म लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन कम्युनिस्ट नेते डॉ. अजित नवले यांनी केले.
येथील मौलाना आझाद तार्बियत हॅालमध्ये उम्मत एज्युकेशन सोसायटी व सर्वधर्मसमभाव मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सर्व धर्म समभाव, एक मानवतेचा संदेश’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॅा.नवले बोलत होते. प्रमुख व्याख्याते म्हणून दीपक महाराज देशमुख व श्रीरामपूर येथील चतुर्वेदी मौलाना मुफ्ती मुहम्मद रिजवानुल हसन मजाहेरी हे होते.
दोघांनी धर्मातील मानवतेची शिकवण याचे सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येक धर्म हा मानवतेचीच शिकवण देतो, अशी भावना दीपक महाराजांनी व्यक्त केली. आपणा सर्वांचा निर्माता एकच असून विश्वबंधूत्व आपण जपले पाहिजे, अशी अपेक्षा चतुर्वेदी मौलाना हसन यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ॲड. वसंत मनकर, ॲड. शाहिद फारुकी, डॉ. संदिप कडलग, डॉ. मनोज मोरे, शांताराम गजे, रमेश जगताप, माधव तिटमे, आरीफ तांबोळी,शांताराम संगारे, अनिल कोळपकर, प्रा. सुरेश खांडगे, नगरसेवक आरीफ शेख,हितेश कुंभार, प्रा आयाज शेख, डॉ.राशिद फारूकी, डॉ. मोहसिन शेख, मुस्ताक तांबोळी, रियाज तांबोळी, नाजिम शेख, शब्बीर शेख,अरशद तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.