वॉशिंग्टन: गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झाले. भारतात देशभर या हुताम्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र चीनने त्यांचे किती जवान मृत्युमुखी पडले हे जाहीर केलेच नाही.
आपण जर असे काही जाहीर केले तर ते आपल्याच अंगलट येईल आणि आजी माजी सैनिकांच्या बंडखोरीचा सामना करावा लागेल, अशी भीती चीनला वाटत असल्याचा दावा त्याच
देशाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या एका माजी नेत्याच्या मुलाने केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये दिलेल्या लेखात हा दावा केला आहे.
जीयानली यांग असे त्यांचे नाव असून ते सिटिझन पॉवर इनिशिएटीव्ह फॉर चायना या संस्थेचे संस्थापकही आहेत. आपल्या लेखात त्यांनी म्हटले आहे की बऱ्याच काळापासून पीपल्स लीबरेशन आर्मी अर्थात पीएलए चीनच्या सत्ताधारी पक्षाची ताकद आणि आधारस्तंभ राहीली आहे. पीएलएचे लाखो आजी माजी सैनिक आहेत. ते अगोदरच जीनपिंग यांच्या नाराज आहेत.
आता जर त्यांच्या भावनेला धक्का बसला तर त्यांनी एकत्र येउन काही कृती केली तर सरकारसमोर अडचणी निर्माण होउ शकतात. एक मोठी शक्ती म्हणून सरकारला आव्हान देण्याची या सैनिकांमध्ये क्षमता आहे. नोकरशाही आणि अन्य
माध्यमातून प्रचंड दबाव टाकला जात असतानाही सैनिकांकडून विरोधाच्या घटना घडत असून त्यात वाढही होत चालली आहे, हेच जिनपींग आणि कम्युनिस्ट सरकारच्या चिंतेचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि चीन संघर्षाचेही जीयानली यांनी उदाहरण दिले. या संघर्षात दोन्ही बाजूंचे नुकसान झाले आहे. त्यात मरण पावलेल्या जवानांची संख्या आणि माहितीही भारताने दिली. या
जवानांना सन्मानाने आदरांजली वाहण्यात आली.
मात्र चीनने आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी अजुनही संख्याही सांगितली नाही व जवानांचे स्मरणही केले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. तब्बल 5.7 कोटी माजी सैनिकांच्या मनात असलेली खदखद हेच यामागचे कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.