नवी दिल्ली – 23 मे पर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी नव्हते. परदेशात चालू असलेल्या व्यापारयुद्धामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेणे चालूच ठेवले होते. मात्र, 23 मे नंतर भारतात स्थिर सरकार येणे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर सरकारने अर्थव्यवस्था वेगवान विकास मार्गावर नेण्यासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळेच आता जागतिक परिस्थिती अनिश्चित असूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करू लागले आहेत.
2 ते 20 मेपर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4375 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र, 23 मे या एकाच दिवशी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात 1352 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानंतर गेल्या एक आठवड्यात या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात बरीच गुंतवणूक केली आहे.