नेवासा, (प्रतिनिधी) – कारखाना व डिस्टिलरीचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण पूर्ण झाले असून भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत-जास्त भाव देणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 50 व्या गळीत हंगामाची सांगता गुरुवारी सकाळी 9 कारखान्याचे अध्यक्ष ,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, तज्ज्ञ संचालक डॉ.क्षितीज घुले पाटील, काशीनाथ नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे यांचे प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी संचालक शिवाजीराव कोलते व निर्मला कोलते यांच्याहस्ते ऊस गव्हाण पूजन करण्यात आले. ऊसतोडणी मुकादम, मजूर, वाहतूकदार, ऊसतोड यंत्रमालक, ठेकेदार, कार्यकारी संचालक व सर्व खातेप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.
घुले म्हणाले की, प्रतिकूल परिस्थिती असतानाही सर्वांच्या सहकार्याने यावर्षीचा गळीत हंगाम यशस्वी झाला. या हंगामात 11 लाख 40 हजार मे.टन उसाचे गाळप होऊन 11 लाख 51 हजार साखर निर्मिती झाली. सहविज निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेली 5 कोटी युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे.
डिस्टिलरीच्या यावर्षीच्या हंगामात 1 कोटी 50 लाख लिटर रेक्टिफाइड स्पिरिट व 1 कोटी 40 लाख लिटर इथेनॉलचे निर्मिती होणार आहे. साखर कारखाना तीन शिफ्टमध्ये अविरत चालणारा उद्योग आहे. ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कामगार, ऊसतोड वाहतूक कामगारांचे यात मोठे योगदान आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.अभंग म्हणाले की, साखरेचे दर कमी झालेले असताना केंद्राने ऊसाचा रस/सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. ऊसतोड मजुरांची मोठी जटील समस्या निर्माण झाली,मात्र ऊसतोडणी यंत्रणाची मोठी मदत झाल्याने आपण गाळपाचे उद्दिष्ट गाठू शकलो. शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची अन्य विल्हेवाट न लावता पुढील हंगामात संपूर्ण ऊस ज्ञानेश्वरलाच द्यावा, असे आवाहन अभंग यांनी केले.
कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, मच्छिंद्र म्हस्के, संतोष पावसे, पंडितराव भोसले, बबनराव भुसारी, दीपक नन्नवरे, जनार्दन कदम, भाऊसाहेब कांगुणे, सखाराम लव्हाळे,अशोकराव मिसाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, तुकाराम मिसाळ, एकनाथ कावरे, शिवाजी घोरपडे, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नवले,
डॉ.शिवाजी शिंदे,नामदेव निकम, उत्तमराव आहेर, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, तांत्रिक सल्लागार इंजिरिअरिंग एस.डी.चौधरी, मुख्य अभियंता राहुल पाटील, तांत्रिक सल्लागार डिस्टिलरी महेंद्र पवार यांचेसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक अॅड.देसाई देशमुख यांनी स्वागत केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बबनराव भुसारी यांनी आभार मानले.