जम्मू – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजप ४०० हून अधिक जागा जिंकण्याची चर्चा करत आहे, मात्र पक्षात अजूनही अस्वस्थता आहे.
जर तुम्हाला ४०० जागांची खात्री आहे, तर मग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची तुम्हाला भीती का वाटत आहे? त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. दुसरीकडे, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मनमानी अटक राजकीय सूडबुद्धीची कृती असल्याचे दिसते.
ईडीने आणखी एका मुख्यमंत्र्यांची मनमानी पद्धतीने केलेली अटक राजकीय सूडबुद्धी आणि वाढत्या हुकूमशाहीला चालना देते आहे. या भ्याड कृत्याने सत्ताधाऱ्यांची धास्ती उघड झाली आहे की, आता निवडणुका होण्याआधीच हेलपाटे मारून घातपाती कारवाया केल्या जात आहेत. इतिहास साक्षी आहे की, जुलुमशाहीला कधीही विजय मिळवता आला नाही. आम्ही घाबरणार नाही.
ओमर अब्दुल्ला म्हणाले, सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याच्या काही दिवसांतच विरोधी पक्षाच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना केंद्रीय एजन्सीने अटक करणे हा लोकशाहीवर डाग आहे. मात्र ही पहिली किंवा शेवटची घटना नाही. भविष्यात इतरत्रही हे घडू शकते. यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांनी राजभवनात जाऊन राजीनामा सादर केला, कारण पुढे काय होऊ शकते हे त्यांना माहीत होते. विद्यमान मुख्यमंत्री म्हणून ते तुरुंगात गेले असते तर भाजपने संविधानाचा वापर करून राष्ट्रपती राजवट लावली असती. दिल्लीत आता कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू केली काऊ शकते.