Arvind Kejriwal । अबकारी धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली.
दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय समन्वयकाला एजन्सीच्या कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांची अटक झाली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
या अटकेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा यांनीही या घटनेवरून X वरून पोस्ट करत मोदी सरकार निशाणा साधला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेवर माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
VIDEO | Here’s what Social Activist Anna Hazare said on Delhi CM Arvind Kejriwal’s arrest by ED.
“I felt bad that Arvind Kejriwal who used to work with me and raised his voice against liquor, is himself making liquor policy.”
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/f3l1l4MIWy
— Press Trust of India (@PTI_News) March 22, 2024
अण्णा हजारे म्हणाले,’मला वाईट वाटले की माझ्यासोबत काम करणारे आणि दारूच्या विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल स्वतः दारूचे धोरण बनवत आहेत.” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Arvind Kejriwal । अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात उडी घेतली तेव्हा…
-2011 मध्ये, अरविंद केजरीवाल यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासमवेत जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीची मागणी करत इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप (IAC) ची स्थापना केली. जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट रोजी अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते.
– हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी अण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंनंतर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले होते.
हे वाचले का ? ‘आयआरएस अधिकारी, अण्णा हजारे यांचे शिष्य…’केजरीवाल यांचा असा आहे सामान्य माणूस ते मुख्यमंत्री होण्याचा ‘प्रवास’