Samruddhi Mahamarg Accident| समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. हा महामार्ग सुरू झाल्यापासून येथे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच शुक्रवारी 8 मार्च रोजी येथे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. एका कारची ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (24) आणि आशिष सरवदे (37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नेमका कसा झाला अपघात ? Samruddhi Mahamarg Accident|
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भंडाऱ्यातील हे चौघे कारने (क्र. एमएच ४३, एएल ८०२१) मुंबईला गेले होते. शुक्रवारी रात्री भंडाऱ्याकडे परत जात असताना त्यांची कार समृद्धी महामार्गाने चॅनल क्र. ४३६ जवळ आली आणि त्यावेळी समोर लोडिंग ट्रक (क्र. सीजी १५, डीबी ७१५८) जात होता. घाटासारखा रस्ता असल्याने ट्रकची गती मंद होती. त्या ट्रकवर पाठीमागून भरधाव कारने धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ ही घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही थांबत नसून महामार्ग सुरू झाल्यापसून अनेक अपघात झाले आहेत. आतापर्यंत या महामार्गावर एक हजाराच्यावर अपघात झाले आहेत. आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या महामार्गावर प्रवास करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. Samruddhi Mahamarg Accident|
हेही वाचा:
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या ‘गळाभेटीनं’ चर्चांना उधाण