नवी दिल्ली – बलुचिस्तानमध्ये आणखीन एका व्यक्तीचे न्यायबाह्य पद्धतीने अपहरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर संतप्त जमावाने चीन-पाकिस्तान-इकॉनॉमिक कॉरिडॉरचा माहामार्ग रोखून धरला. आपल्या कुटुंबीयांनी महामार्ग रोखून धरला असून अपहरण जालेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्यात यावी, अशी मागणी बलुच नेत्या महरंग बलुच यांनी केली आहे.
वाहिद बक्स असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते केट गावातील रहिवासी आहेत. त्यांना सुरक्षा रक्षकांनी घरातून बाहेर काढून पळवून नेले गेले आहे. त्यांचे कुटुंबीय देखील या धरणे आंदोलनात सहभागी झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान फ्रन्टिअर कॉर्पच्या अधिकाऱ्यांकडून आपल्या कुटुंबीयांना धमकावले जाते आहे. आंदोलकांना मारहाण देखील केली जात आहे, असा आरोपही बलुच यांनी केला आहे.
बलुच कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
शुक्रवारी बहादुर चकार नावाच्या एका तरुणाला पाकिस्तानी सैन्याने त्याच महामार्गावरच्या धरणे आंदोलनादरम्यान बळजबरीने पळवून नेले होते. सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पीडितेच्या कुटुंबात यशस्वी वाटाघाटी झाल्यानंतर तरुणाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते.