नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या गाडीवर पश्चिम बंगाल मध्ये नव्हे तर बिहारच्या कटिहार मध्ये हल्ला झाल्याचा खुलासा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला आहे. राहुल गांधींच्या गाडीची मागची काच फुटल्याच्या स्थितीत या गाडीने पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला आहे.
त्या म्हणाल्या की, राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा संदेश मला मिळाला. त्यानंतर मी नेमके काय घडले ते तपासले आणि ही घटना बंगालमध्ये नसून कटिहारमध्ये घडल्याचे आढळले.त्या येथील सार्वजनिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारत जोडो न्याय यात्रे’वर असलेले राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात ज्या गाडीने जात होते, त्या गाडीवर बुधवारी अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली, असा दावा राज्य काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी केला.
या घटनेत वाहनाच्या मागील खिडकीचा काच फुटला मात्र गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.ही घटना बिहारची आहे आमच्या राज्यातील नाही असेही ममतांनी स्पष्ट केले. बिहार मध्ये जेडीयु इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची ही संतप्त प्रतिक्रीया असावी अशी शंकाही ममतांनी व्यक्त केली.