Arun Govil : आजही आपण टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट मालिकेबद्दल बोललो तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’चे (Ramayana) नाव अग्रस्थानी येईल. 1987 मध्ये सुरू झालेले रामानंद सागर यांचे रामायण लोकांना इतके आवडले की,
लॉकडाऊनच्या काळात ‘रामायण’ पुन्हा प्रसारित झाले होते, तेव्हा पुन्हा रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला. लोक या शोवर विश्वासू होते आणि त्यातील पात्रांना वास्तविक देव मानले जाऊ लागले. उत्कृष्ट कास्टिंग हे त्यामागचे खरं कारण होते.
त्यावेळी लोकांनी श्रीरामाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते ‘अरुण गोविल’ (Arun Govil) यांना खरेच प्रभू श्रीराम मानले होते. पण तुम्हाला माहीत आहे का की शोमध्ये त्याची कास्टिंग कशी झाली, तर याआधी त्यांना नाकारण्यात आले होते.
त्याचं झालं असं की अरुण गोविल यांनी श्री रामच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण ते त्या रोलमध्ये बसत न्हवते. अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कमतरता कुठे आहे हे समजू शकत नाही. शेवटी पुन्हा एकदा स्क्रीन टेस्ट झाली. यावेळी अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. फक्त एका हसण्याने त्याचे काम झाले आणि त्यांना ही भूमिका मिळाली.
एका एपिसोडचे बजेट 9 लाख रुपये होते-
या शोमध्ये खूप मेहनत घेण्यात आली होती. केवळ पटकथा, संवादच नाही तर पात्रांच्या सेट्स आणि वेशभूषेचीही विशेष काळजी घेतली गेली. त्यामुळे प्रत्येक एपिसोडचं बजेटही प्रचंड होतं. त्यावेळी एक एपिसोड बनवण्यासाठी 9 लाख रुपये खर्च आला होता.
तथापि, या शोने इतकी लोकप्रियता मिळवली की एका भागाची कमाई खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. टीव्हीच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो ठरला आहे.