शिवमोग्गा (कर्नाटक) – हिंदुंवर हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार करण्याचा हिंदुंना अधिकार आहे असे प्रतिपादन भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येबद्दल बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिंदुंना आपल्या घरात किमान चाकू धारदार ठेवण्याचे आवाहन केले. कारण प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, त्यांच्याकडे जिहादची परंपरा आहे, काही नाही तर ते लव्ह जिहाद करत आहेत. जरी ते लव्ह जिहाद करीत असले तरी त्यातही जिहाद असतोच. आम्ही हिंदू देखील प्रेम करतो, देवावर प्रेम करतो, एक संन्यासी त्याच्या देवावर प्रेम करतो, असे त्या म्हणाल्या. काल येथे हिंदू जागरण वेदिकेच्या दक्षिण विभागीय वार्षिक अधिवेशनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, देवाने निर्माण केलेल्या या जगात संन्यांशांची अशी भूमिका असते की, सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, नाही तर प्रेमाची खरी व्याख्या येथे टिकणार नाही.
त्यामुळे संबंधितांना उत्तर द्या. लव्ह जिहाद पासून तुमच्या मुलींचे रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या घरात शस्त्रे ठेवा, बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरलेले जाणारे धारदार चाकू ठेवा, कधी काय परिस्थिती निर्माण होईल सांगता येत नाही. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जर कोणी आमच्या घरात घुसखोरी केली आणि आमच्यावर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देणे हा आमचा अधिकार आहे असे त्या म्हणाल्या.
पालकांनी आपल्या मुलांना मिशनरी संस्थांमध्ये शिक्षण न देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मिशनरी संस्थांमध्ये शिक्षण घेतल्याने तुमची मुले तुमच्या संस्कृतीची राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या. तुमच्या घरी पूजा करा, तुमचा धर्म आणि शास्त्र वाचा, तुमच्या मुलांना त्याबद्दल शिकवा, जेणेकरून मुलांना आमची संस्कृती आणि मूल्ये कळतील,असे आवाहनही त्यांनी केले.