नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यासाठी निराशाजनक बातमी आहे. नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून देशातील बँक घोटाळ्यात आणि फसवणुकीत महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. आरबीआयच्या अहवालातून असे दिसून येत आहे. देशातील एकूण घोटाळय़ाच्या रक्कमेपैकी 50 टक्के रक्कमेचे घोटाळे एकटय़ा महाराष्ट्रात होत आहेत. घोटाळ्यांच्या या यादीत महाराष्ट्रानंतर दिल्लीचा दुसरा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी तेलंगणा हे राज्य आहे.
तर अनुक्रमे दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये मिळून 2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. हे प्रमाण देशाच्या तुलनेत 83 टक्के आहे.आरबीआयच्या अहवालानुसार, गेल्या 7 वर्षांत बँकिंग घोटाळय़ांमुळे रोज 100 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. अशा एकूण घोटाळय़ातील रक्कमेपैकी 50 टक्के रक्कमेचे घोटाळे एकटय़ा महाराष्ट्रातील आहेत.
1 एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत
– अडीच लाख कोटींचे घोटाळे
– 2015-16 मध्ये 67,760 कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस
– 2016-17 मध्ये ते कमी होऊन 59,966 कोटींवर
2019-20 मध्ये 27,698 कोटीचे घोटाळे
2020-21 मध्ये 10,699 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची प्रकरणे नोंदवली
चालू आर्थिक वर्षात पहिल्या 9 महिन्यांत अशा घोटाळ्यांची रक्कम फक्त 647 कोटी रुपये आहे. बँकिंग घोटाळय़ांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
.