कोल्हापूर – शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये कर्जमाफी देण्यात यावी, यासाठी कसबा बीड ते कलेक्टर ऑफिस 1 नोव्हेंबरला पायी दिंडी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी आंदोलक मुकुंद पाटील यांनी केले.
मुकुंद पाटील म्हणाले, कसबा बीड ते मंत्रालय असे पायी दिंडी आंदोलन नियोजित होते. पण करोनामुळे ते कसबा बीड ते कोल्हापूर कलेक्टर कार्यालय पायी दिंडी काढून आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी अडाणी नाही तर शासनप्रणाली चुकीचे आहे.
विक्री व्यवस्थेत बदल करुन शेतीमालास योग्य हमीभाव मिळावा व व्यापारी बिले वेळेत मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत सुटतील. शेतकरी कर्जमाफीसह पिक कर्ज, शेतीसाठी 24 तास वीज, महिला बचत गटाच्या कृषीकर्ज माफ आणि रासायनिक खते यांचे दर कमी करावेत, स्वामीनाथन शिफारस लागु करावी यासाठीही सरकारकडे साकडे घालणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.