नवी दिल्ली- सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीचा नफा दुसऱ्या तिमाहीत 66 टक्क्यांनी कोसळला आहे.
या तिमाहीत कंपनीला केवळ 487 कोटी रुपयाच्या नफ्यावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीला 1,420 कोटी रुपयाचा नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीची वाहन विक्री तीन टक्क्यांनी कमी होऊन 3,79,541 इतकी झाली आहे.
कंपनीच्या देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे कंपनीची अपेक्षेपेक्षा 1 लाख 16 हजार वाहने कमी झाली आहेत. सिमेंट, पोलादाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.