रायपूर – तरूणाने आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रायपूरमध्ये घडली आहे. कमलेश साहू (केंद्री, रायपूर) असे हत्या करून आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
ही घटना रायपूर येथील अभनपूरमधील केंद्री गावात घडली असून घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत होते त्यातून युवकाने हे पाऊल उचलले असावे, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.
रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी सांगितले की, कमलेश साहूने आई, पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. कमलेशचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तर त्याच्या आई, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले.
या घटनेमुळे परिसरासह राज्यात खळबळ उडाली असून छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.