नगर – जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या विविध पिकांची पेरणी करण्याचे धाडस दाखविले आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ 54.8 टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. सर्वाधिक सोयाबीन, कापूस व तूर पिकांची पेरणी झाली आहे. प्रत्यक्ष पेरणी झालेले सर्व विके रोप अवस्थेत आहेत.
जिल्ह्यात या आठवड्यात 47.4 मी.मी पावसाची नोंद झाली असून 6 लाख 74 हजार 461.08 हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत 3 लाख 69 हजार 625. 65 हेक्टर क्षेत्रावर पेरणीर झालेली आहे. सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयबीनसाठी 87 हजार 330 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत 1 लाख 99.8 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. म्हणजेच 114.62 टक्के पेरणी झाली आहे. त्याखालोखाल तूरची 91.96 टक्के पेरणी झाली आहे. 36 हजार 104 हेक्टरपैकी 33202 हेक्टर वर तूरची पेरणी झाली आहे. तर कापसाची 90.12 टक्के पेरणी झाली. या पिकासाठी 1 लाख 22 हजार 86 हेक्टरचे उद्दीष्टे ठेवण्यात आले असून आतापर्यंत 1 लाख 10 हजार 24.2 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहेत. उर्वरित पिकांमध्ये बाजरी- 28 टक्के, ज्वारी- 6.12 टक्के, मका- 5 58.42, मूग- 30.18, उडीद- 48.71 टक्के, भूईमुग- 30.34, कारळे- 43.18, सूर्यफुल- 20.17, ऊस – 9.48 अशाप्रकारे पेरणी झाली आहे.
मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफुल या पिकाची पेरणी झाली असून असून कापूस, सोयाबीन, बाजरी, मका ही पिके उगवण अवस्थेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मोठा पाऊस न झाल्याने निम्म खरीपाचे क्षेत्र अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस चांगला न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आता ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे. पाटपाणी मिळण्याची शाश्वती आहे. अशा ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. मात्र पावसावर पिके अवलंबून आलेल्या ठिकाणी अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत. तेथे अजूनही काळ रान दिसत आहे.
भात शेती अडचणीत
अकोले तालुक्यात भात शेती मोठ्या प्रमाणावर होते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने आतापर्यंत केवळ 3.6 टक्के पेरणी भातीची झाली आहे. भात पिकासाठी 17 हजार 275.60 हेकटर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 621.5 हेक्टर क्षे9ावर भात पिकाची लागवड झाली आहे. त्यामुळे सध्या तरी अकोल्यातील भात शेती अडचणीत आली आहे.
शेवगाव तालुक्यात शंभर टक्के पेरण्या
शेवगाव तालुक्यात पाऊस कमी असतांनाही शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यात कापसाचे पिक मोठ्या प्रमाणवर आहे. जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी या तालुक्यात मोठ्या प्रमाणवर कापसाचे पिक घेण्यात येते. त्यात शेवगावाने बाजी मारली असून आज शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यात कापसाचे प्रमाण मोठे आहे.