छोटी राज्ये बनवा!
पाटणा, दि. 12 – शासन आणि जनता यातील अंतर कमी करण्यासाठी छोटी छोटी राज्ये निर्माण करावीत, अशी सूचना जयप्रकाश नारायण यांनी केली आहे. छोट्या राज्यातील जनता; मुख्यमंत्री व इतर मंत्री यांना सहज भेटू शकतील. लोकांचे प्रश्न सोडविणेही सुलभ होईल.
उत्तर बिहार व दक्षिण बिहार असे बिहारचे दोन भाग केले पाहिजेत. फार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या विभाजनाची सूचना मी पंडित नेहरू यांना केली होती. त्यावर नेहरू म्हणाले होते, दोन का तीन विभाग करा. पण गोविंद वल्लभपंत यांनी त्यास
विरोध केला.
करवसुली करताना मानवातावादी दृष्टिकोन!
कोल्हापूर – संपत्ती इतकीच मानवता महत्त्वाची आहे. म्हणून कर वसुली करणारे शासन असो अथवा करदाते उद्योगपती असो माणुसकीचा दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या करांपैकी 62 टक्के इतका मोठा हिस्सा विक्रीकराचा असतो. राज्य व केंद्राच्या उत्पन्नात कराद्वारे होणाऱ्या उत्पन्नाचा वाटा सर्वाधिक असतो. कर योजनेसंबंधी नव्या मार्गाचा व नव्या दृष्टीचा विचार केला पाहिजे.