केतकावळे- लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील कुटुंबांवर ऊपासमारीची वेळ आली आहे. 27 गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किराणा कीटचे वाटप करण्यात आले. बहिरवाडी (ता. पुरंदर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरजूंना सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे, बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने पुरंदर – भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बहिरवाडीचे सरपंच बापू जानकर, येसाजी कामठे प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त हेमंत कामठे, स्वप्निल म्हेत्रे, कैलास धिवार, सुनील लोणकर, संदेश सोनवणे उपस्थित होते.