U19 World Cup 2024 Super Six phase,India vs Nepal Cricket Match Score : अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड अबाधित आहे. आज भारतीय संघाने नेपाळचा सहज पराभव केला. टीम इंडियाने 132 धावांनी मोठा विजय मिळवला. अशाप्रकारे भारतीय संघाने सुपर-6 फेरीत सलग दुसरा विजय नोंदवला. त्याचबरोबर या विजयानंतर उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
यापूर्वी उदय सहारनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 214 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय आहे. आत्तापर्यंत बांगलादेश व्यतिरिक्त भारतीय संघाने आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळला पराभूत केले आहे.
For his excellent hundred in the first innings, Sachin Dhas is adjudged the Player of the Match 👏👏
The #BoysInBlue will face South Africa U19 in the Semi-final of the #U19WorldCup 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/6Vp3LnoN6N#INDvNEP pic.twitter.com/UtFXzp2aME
— BCCI (@BCCI) February 2, 2024
विजयासाठी 298 धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांसमोर नेपाळची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. या संघासाठी सर्वात मोठी धावसंख्या कर्णधार देव खनालने केली आणि त्याने 33 धावांची खेळी केली. दुर्गेश गुप्ताने 29 धावांची नाबाद खेळी खेळली. नेपाळच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. या सामन्यात नेपाळने दहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली आणि भारतीय गोलंदाजांना या संघाला आॅल आऊट करता आले नाही. या सामन्यात नेपाळ संघाने 50 षटकात 9 गडी गमावून 165 धावा केल्या आणि 132 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर भारत गट 1 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर सौमी पांडे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सौमी पांडेने 10 षटकांत 29 धावा देत 4 नेपाळी फलंदाजांना आपले बळी बनवले. अर्शीन कुलकर्णीने 2 बळी घेतले. याशिवाय राज लिंबानी, आराध्या शुक्ला आणि मुरुगन अभिषेक यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच विकेट गमावत 50 षटकात 297 धावा केल्या. भारताकडून कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी शतके झळकावली. सचिनने 101 चेंडूत 116 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर उदय सहारनने 107 चेंडूंत नऊ चौकारांसह 100 धावा केल्या.
या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. आदर्श सिंग 21 धावा करून, अर्शिन कुलकर्णी 18 आणि प्रियांशू मोलिया 19 धावा करून बाद झाले. शेवटी मुशीर खानने नाबाद नऊ धावा केल्या. नेपाळकडून गोलंदाजीत गुलशन झा याने सर्वाधिक तीन बळी घेतले. आकाश चंदला एक विकेट मिळाली.