अमरावती – अमरावती नजीक रात्री उशिरा एका मालगाडीला अपघात झाला. रेल्वेचे तब्बल २० डबे ट्रॅकवरून घसरल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मालखेडनजीक हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही मालगाडी कोळश्याची वाहतूक करत असल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
ऐन दिवाळीत झालेल्या या रेल्वे अपघातामुळे तब्बल ५० हुन अधिक गाड्यांचा खोळंबा झाला. अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक या अपघातामुळे बदलण्यात आले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडल्याने रेल्वेकडून बचावकार्य सुरु करण्यात आले परंतु मदतकार्य पोहचण्यासाठी काहीसा विलंब झाला.
Maharashtra| 20 loaded coal wagons derailed b/w Malkhed &Timatla stations on Wardha-Badnera sections,Nagpur at around 23.20hrs on Oct 23,resulting in Dn&Up line affected on this section. Multiple trains cancelled/diverted/short terminated; helpline no 0712-2544848:Central Railway pic.twitter.com/gcXrjT2zG8
— ANI (@ANI) October 24, 2022
मिळालेल्या माहितीनुसार टिमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे दरम्यान कोळशाची वाहतूक करणारी रेल्वे गाडी इंजिन आणि १५ ते २० डब्यांसह रुळावरून घसरली. यावेळी मोठा आवाज झाला,डबे रुळावर आडवे झाल्याने रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ माहिती वरिष्ठांना देण्यात आली आणि मदतकार्य सुरु झाले.