Ishwarpur News : ईश्वरपूरमधील मोर्चात हजारो युवक रस्त्यावर; सदाभाऊ खोत यांच्या राजीनाम्याची मागणी
Ishwarpur News : वाळवा तालुक्यातील हजारो युवक, पदवीधर व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ईश्वरपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला.

Ishwarpur News : वाळवा तालुक्यातील हजारो युवक, पदवीधर व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी ईश्वरपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला. विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणारे आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Ishwarpur News)
वाळवा पंचायत समितीतील क्रांतिसिंह नाना पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भगतसिंह यांच्या तस्विरी हातात घेतल्या होत्या. (Ishwarpur News)
‘नही चलेंगी नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी, इंन्कलाब जिंदाबाद, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहराच्या मुख्य मार्गांवरून मोर्चा कचेरी चौकात आला. (Ishwarpur News)
विरेन शिंदे, गायत्री घोडे, आरती यादव, संचिती यादव, अर्शिया आत्तार, कांचन सूर्यवंशी, प्रणाली गायकवाड, शिवानी रहाटे, ऋतुजा पाटील या विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. कॉ. धनाजी गुरव म्हणाले, ‘मुलांना शिकण्याचा हक्क लढ्यातून मिळाला आहे. पेपर फुटी हा आरएसएसच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग आहे. (Ishwarpur News)
मुलांना उध्वस्त करण्याचा डाव आहे. आंदोलनातून मोठा झालेला सदाभाऊ खोत विद्यार्थ्यांना आतंकवादी कसे म्हणू शकतात?’ बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी.जी.पाटील व वंदना कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी नगराध्यक्ष खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे यांनी शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. (Ishwarpur News)
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, अरुणादेवी पाटील, देवराज पाटील, अभिजित पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, माणिकराव पाटील उपस्थित होते. विशाल सूर्यवंशी, संग्राम जाधव,अभिजित शिंदे, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर, अभिमन्यू क्षीरसागर, विशाल माने, रुद्र आडके, स्वरूप मोरे व विविध संघटनांनी आंदोलनाचे संयोजन केले. (Ishwarpur News)
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फटाक्यांची आतषबाजी
येथे आज सकाळी जाहीर निषेध व ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, थोड्याच वेळात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन साखर वाटून आंदोत्सव साजरा केला. यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. (Ishwarpur News)
Ishwarpur News : टेबलावर वजन ठेवल्याशिवाय वाळवा तहसील कार्यालयात काम होत नाही : आमदार जयंत पाटील
Ishwarpur News : ईश्वरपूरचे नगरसेवक सुनील मलगुंडे अपात्र; शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के





