अहमदाबाद – चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (28 मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी म्हणजेच राखीव दिवशी चॅम्पियनचा निर्णय होणार आहे.
संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.
अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री 11 वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागला असता. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती.
दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी म्हणजेच राखीव दिवशी रात्री साडेसात वाजता खेळला जाईल. रात्री नऊ वाजता पाऊस थांबला होता आणि मैदान जवळपास खेळण्यायोग्य झाले होते, पण पाऊस पुन्हा आला. त्यानंतर रात्री 11 वाजता पाऊस थांबला. पण त्यानंतर परिस्थिती पाहता सामना सोमवारी म्हणजेच राखीव दिवशी होईल असा निर्णय घेण्यात आला.
Physical tickets for today will be valid tomorrow. We request you to keep the tickets safe & intact. #CSKvGT pic.twitter.com/d3DrPVrIVD
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
आयपीएलने सामन्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रात्री 7:30 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रिझर्व्ह डेला होणार आहे. आजची सामन्याची तिकिटे उद्या वैध असतील. आम्ही तुम्हाला तिकीट सुरक्षित आणि अबाधित ठेवण्याची विनंती करतो.