Lok Sabha Election 2024 । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (17 मे) नाशिक लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी युतीचे उमेदवार शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, डॉ भीमराव आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकत नाही. काँग्रेस फक्त खोटारडेपणा पसरवत आहे.
ते पुढे म्हणाले,’डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकत नाही. फक्त त्याचे विभाग बदलले किंवा सुधारले जाऊ शकतात. काँग्रेसने 80 वेळा घटना दुरुस्तीचे पाप केले आहे. असे असतानाही ते आम्ही संविधान बदलू असा खोटा प्रचार करत आहेत. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, सबका साथ, सबका विकास हा नरेंद्र मोदी सरकारचा मंत्र असून, कोणत्याही समाजाचा भेदभाव न करता विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.
Lok Sabha Election 2024 । काँग्रेसने 80 वेळा घटनादुरुस्ती केली – गडकरी
‘नाशिक विभागात कांदा आणि द्राक्षे या दोन प्रमुख पिकांची साठवणूक आणि प्रक्रिया करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही नितीन गडकरी म्हणाले होते की, आमचे विरोधक लोकांना पटवण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होत आहे. ते म्हणतात की आम्ही संविधान बदलू, पण सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे ज्यामध्ये संविधान बदलता येणार नाही. फक्त दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात. आतापर्यंत काँग्रेसने 80 वेळा घटनादुरुस्ती केली आहे.
गडकरी पुढे म्हणाले की,’आम्ही आमचे काम सुरूच ठेवू आणि शेवटच्या गरीबाला लाभ मिळेपर्यंत थांबणार नाही. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील जनता गरीबच राहिली. आम्ही 10 वर्षे काम केले, पण 60 वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने काहीच केले नाही. त्यामुळे आता आपले काम मांडून निवडणूक लढवता येत नसताना ते लोकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे.’ असेही ते म्हणाले आहे.