Shubman Gill Statement : व्हीव्हीएस लक्ष्मण अन् संघ व्यवस्थापनात वाद? ‘कम्युनिकेशन गॅप’वर शुबमन गिलचे सडेतोड उत्तर
Shubman Gill Statement : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार शुबमन गिलने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

Shubhman Gill Statement on BCCI COE Team Management Communication : भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’ (CoE) आणि टीम मॅनेजमेंट यांच्यातील संवादामध्ये ताळमेळ नसल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन हे दोन महत्त्वाचे खेळाडू तंदुरुस्त न झाल्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
बुमराह आणि साई सुदर्शन दुखापतीमुळे बाहेर –
जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांची निवड ‘तंदुरुस्तीच्या अधीन’ (Subject to fitness) करण्यात आली होती. सुरुवातीला वैद्यकीय पथकाने हे खेळाडू फिट होण्याची शक्यता वर्तवली होती आणि ते किमान एक सामना तरी खेळतील असा अंदाज होता. मात्र, मालिकेची वेळ जवळ येताच दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकले नाहीत आणि त्यांना संघातून वगळण्यात आले. सध्या भारताचे जवळपास १३ खेळाडू दुखापतींशी झुंजत आहेत; यावर सीओई चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी स्पष्ट केले होते की, सीओई केवळ रिहॅब सेंटर नसून खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी काम करते आणि व्यवस्थापनासोबतचा संवाद पूर्णपणे स्पष्ट आहे.
🚨 Shubman Gill Press Conference🚨
“I am comfortable in my role as captain now. Our goal is to stay in contention for berth in World Test Championship final. We need to win 6 or 7 Tests for that so we want to make a beginning here.”#INDvSL pic.twitter.com/odvclJagUY
— Indian Cricket 🏏 (@Indiancric1cm) August 14, 2026
कर्णधार शुबमन गिलने मांडली खरी बाजू –
व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या विधानाला दुजोरा देत कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “संवादामध्ये कसलीही समस्या किंवा गोंधळ नाही. साई सुदर्शनच्या दुखापतीत आम्हाला अपेक्षित होती, तेवढी सुधारणा वेळेत होऊ शकली नाही. हा कसोटी क्रिकेटचा मंच आहे, त्यामुळे आम्ही कोणताही धोका (Risk) पत्करू इच्छित नव्हतो.” गिलच्या या स्पष्टीकरणामुळे व्यवस्थापन आणि सीओईमधील वादाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
साई सुदर्शनला नेमकी काय झाली दुखापत?
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. ‘इंडिया ए’च्या श्रीलंका दौऱ्यात दोन प्रथम श्रेणी सामन्यांत सलग दोन शतके ठोकताना त्याला ही दुखापत झाली होती. साईच्या जागी सर्फराझ खानला तर जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबीला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत नंबर तीनवर देवदत्त पडिक्कल फलंदाजी करताना दिसण्याची दाट शक्यता आहे.





