शिर्डी – स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर “हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शिर्डी शहरामध्ये विद्यार्थी, नागरीकांनी तिरंगा रॅली काढली. भारत माता की जय’, वंदे मातरम्च्या’ जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. मतदार संघातील प्रत्येक शहर, गाव आणि वाड्या वस्त्यांमध्ये नागरीकांना तिरंगा झेंडा देवून या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
शिर्डी शहरामध्ये या निमित्ताने तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील साई निर्माण विद्यालय,आदर्श विद्यालय, उर्दु हायस्कुल, साई गुरुकुल या संस्थांमधील विद्यार्थी, विद्यार्थिंनी, शिक्षक आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, सचिन शिंदे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतिष दिघे, ताराचंद्र कोते, रवि गोंदकर, राम कोते, शाबीरभाई शेख, गजानन शिर्वेकर, तान्हाजी गोंदकर, मधुकर कोते, गफ्फार पठाण, विजय गोंदकर, योगेश गोंदकर आदी सहभागी झाले होते.