Maharashtra Politics : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना संजय जाधव यांच्या एका विधानाने चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) चे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता वेगळी राजकीय वाट धरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. (Maharashtra Politics) परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना संजय जाधव यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत सूचक वक्तव्य केले. “मी ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा विश्वासघात करणार नाही, मात्र सध्याची परिस्थिती बदलली आहे. निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाचं असतं,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे पक्षांतराच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. (Maharashtra Politics) Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ कट्टर समर्थक साथ सोडणार? राजकीय वर्तुळात खळबळ दरम्यान, मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात किंवा भाजपमध्ये जाधव प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडणे टाळल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. (Maharashtra Politics) परभणी जिल्ह्यात संजय जाधव यांची मोठी राजकीय ताकद मानली जाते. त्यामुळे त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेतल्यास तो ठाकरे गटासाठी धक्का ठरू शकतो. आता ते शिवसेनेतच राहणार की नवा राजकीय पर्याय निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics) हेही वाचा : Uddhav Thackeray : ममतांच्या पराभवासाठी 2 लाखांहून अधिक सीआरपीएफ जवान तैनात; उद्धव ठाकरे यांचा दावा Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ म्हणाले “जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर….”