Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांकडून राष्ट्रवादीचा टप्यात कार्यक्रम; नाशिक-रायगडच्या पालकमंत्री पदावरून डावललं
Maharashtra Politics : नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आल्याने अजित पवार गटाला धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे. नाशिकची जबाबदारी भाजपचे गिरीश महाजन, तर रायगडची जबाबदारी शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यांवर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा दावा फेल
नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे एकूण १५ आमदार असून त्यापैकी सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत होता. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र, अखेर फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावरच विश्वास कायम ठेवला. (Maharashtra Politics)
विशेष म्हणजे, यापूर्वी गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतरही भाजपकडून महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. अखेर त्यांची नियुक्ती कायम करण्यात आली. (Maharashtra Politics)
रायगडमध्ये गोगावले यांची बाजी
रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेना शिंदे गटाने सुरुवातीपासूनच दावा केला होता. आमदार भरत गोगावले यांनीही यासाठी उघडपणे भूमिका मांडली होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. (Maharashtra Politics)
संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद नाही
नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीकडे असतानाही पालकमंत्रीपद भाजपकडे गेलं आहे. तर रायगडमध्ये राष्ट्रवादीचा दावा असतानाही शिवसेनेच्या गोगावले यांची नियुक्ती झाली. त्यामुळे “संख्याबळ एकीकडे आणि पालकमंत्रीपद दुसरीकडे” अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Politics)
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक महत्त्वाचं
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवून भाजपची पकड कायम ठेवली, तर रायगडमध्ये शिंदे गटाला संधी देत महायुतीतील समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. (Maharashtra Politics)






