Maharashtra Politics : भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या ‘या’ ५ दिग्गजांचा समावेश
Maharashtra Politics : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील विनोद तावडे, पीयूष गोयल, भारती पवार यांच्यासह ५ नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत.

Maharashtra Politics : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची आणि विविध विभागांच्या संयोजकांची यादी जाहीर केली आहे. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या रचनेत महाराष्ट्रातील पाच नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्रातील ५ नेत्यांकडे कोणती जबाबदारी?
१. विनोद तावडे – राष्ट्रीय सरचिटणीस
भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
२. डॉ. भारती प्रवीण पवार – राष्ट्रीय उपाध्यक्ष
माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३. पीयूष गोयल – राष्ट्रीय कोषाध्यक्ष
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
४. शिवप्रकाश – राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीस
मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. प्रीती गांधी – सोशल मीडिया सह-संयोजक
भाजपचा डिजिटल आणि सोशल मीडिया विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी प्रीती गांधी यांच्याकडे सोशल मीडिया सह-संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
![]()
राष्ट्रीय टीममध्ये कोणाकोणाची वर्णी?
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विविध राज्यांतील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, डी. पुरंदेश्वरी यांच्यासह अनेक नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, सतीश पुनिया यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. तर पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपद, तर बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय संघटन सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राचे राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढणार?
भाजपच्या नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातील पाच नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्याने राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आगामी निवडणुका आणि संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. (Maharashtra Politics)
विशेषतः विनोद तावडे आणि पीयूष गोयल यांच्याकडे आधीपासूनच राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या भूमिका असल्याने महाराष्ट्रातील भाजपसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. (Maharashtra Politics)





