श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेण्याची किमया प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने साध्य होऊ शकते. त्यासाठी कठोर परिश्रम घेऊन स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले.
स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळ, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, श्रीरामपूर शहर काँग्रेस व साई सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ससाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर होते.
बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडवण्यात पालकांचेही मोठे योगदान असते, त्यामुळे मुलांचा कल बघून त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, ध्येयप्राप्तीसाठी केलेल्या कठोर परिश्रमातूनच यशाचा मार्ग मिळतो. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ससाणे यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी मा.नगराध्यक्ष संजय फंड, मा नगरसेवक रमेश कोठारी, सुनील बोलके, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे, रितेश रोटे, बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण, प्रवीण काळे, मर्चंट असोसिएशनचे दत्तात्रय ढालपे, नीलेश नागले, संजय कासलीवाल, प्रकाश थोरात, बाळासाहेब थोरात, गफार पोपटिया, प्रवीण नवले, मा सरपंच भारत तुपे,अशोकराव जगधने,चांगदेव भागवत, सुरेश ठुबे, जियान पठाण आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.