Rain Updates : कोकणासह मुंबईला हायअलर्ट; ७ जुलैपर्यंत वादळं अन् अतिवृष्टीचा इशारा
Rain Updates : कल्याण-डोंबिवलीतील शाळांना सुट्टी जाहीर झाल्यानंतर आता संपूर्ण मुंबई महानगर आणि कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे.

Rain Updates : मुंबईकरांसाठी एक अत्यंत मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. (Rain Updates)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अत्यंत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Updates)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याने 7 जुलैपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. (Rain Updates)
मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. (Rain Updates)
आपण दर तीन तासांनी या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. काही ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांना विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. (Rain Updates)
Rain Alert : पुढील 4 दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता






