Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना सलग धक्के बसत आहेत. तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि विश्वासू अधिकाऱ्यांनी एकामागोमाग राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा दीर्घकाळ प्रभावी राहिलेला ‘कोर ग्रुप’ आता विस्कळीत होत असल्याची चर्चा रंगली आहे. (Mamata Banerjee) मुख्यमंत्रीपदाच्या सल्लागारपदी कार्यरत असलेले माजी मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय आणि एच. के. द्विवेदी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. विशेषतः अलापन बंद्योपाध्याय यांच्या राजीनाम्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. २०२१ मधील ‘यास’ चक्रीवादळानंतर केंद्र सरकारशी झालेल्या संघर्षात ममता बॅनर्जी यांनी त्यांची जोरदार बाजू घेतली होती. प्रशासनातील त्यांचे सर्वात विश्वासू अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. (Mamata Banerjee) दरम्यान, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिरूप सरकार यांनीही पश्चिम बंगाल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. “मुख्यमंत्री निवडणूक हरल्या आहेत, त्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mamata Banerjee) Mamata Banerjee : सत्ता गमावताच ममता बॅनर्जींना मोठा धक्का; अनेक विश्वासू सहकाऱ्यांचे राजीनामे राज्याचे महाधिवक्ता किशोर दत्ता यांनीही पदाचा राजीनामा सादर केला आहे. शिक्षक भरती घोटाळा आणि निवडणूक हिंसाचारासारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे सरकारचा महत्त्वाचा कायदेशीर आधारही कमी झाला आहे. (Mamata Banerjee) याशिवाय, ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाणारे अनेक मीडिया सल्लागार, पत्रकार आणि विविध महामंडळांवरील पदाधिकारीही पदांपासून दूर जात आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेसची राजकीय आणि मीडिया यंत्रणा मोठ्या प्रमाणात कमजोर झाल्याचे मानले जात आहे. (Mamata Banerjee) दरम्यान, पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली असून निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. दुसरीकडे, बंगालमध्ये भाजपने २९४ पैकी २०७ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसची सलग १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. आता ममता बॅनर्जी जुन्या सहकाऱ्यांशिवाय राजकीय पुनरागमन करू शकतील का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Mamata Banerjee)