Maharashtra Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरला; ‘या’ तीन जिल्ह्यांना बसला धक्का
Maharashtra Earthquake : महाराष्ट्रातील नाशिक, पालघर आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये शनिवारी (२५ जुलै) ३.१ ते ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हलके धक्के बसले आहेत.

Maharashtra Earthquake : नाशिक, पालघर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी 3.1 ते 3.6 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. कोठेही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. नाशिक जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचे चार धक्के जाणवले. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात सकाळी ९.५५ वाजून ५० मिनिटांत भूकंपाचे धक्के जाणवले. या आठवड्यात या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. (Maharashtra Earthquake)
पालघर जिल्ह्याच्या काही भागात सकाळी 10:57 वाजता 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला, त्याचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील गंजाड परिसरात होता, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले. (Maharashtra Earthquake)

पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू आणि तलासरी पट्ट्यांमध्ये वारंवार कमी तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवतात. तसेच हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी ६.४९ वाजता ३.१ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला, ज्याचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण येथे सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होता. (Maharashtra Earthquake)





